शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सांगली, माधवनगरला आठ घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 15:09 IST

सांगली : माधवनगर रस्त्यावरील शिवोदयनगर आणि माधवनगर (ता. मिरज) येथे चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री भरपावसात धुमाकूळ घालत आठ घरे फोडली. अनेक घरांना बाहेरुन कड्या लाऊन घेतल्याने नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही. केवळ ज्येष्ठ पत्रकार दिलीप भिसे यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा ६० हजाराचा ऐवज चोरट्यांच्या हाती लागला.माधवनगर रेल्वे स्थानकाजवळ ...

ठळक मुद्देचोरट्यांचा धुमाूकळ ६० हजाराचा ऐवज लंपासघरांना बाहेरुन कड्या लावल्या

सांगली : माधवनगर रस्त्यावरील शिवोदयनगर आणि माधवनगर (ता. मिरज) येथे चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री भरपावसात धुमाकूळ घालत आठ घरे फोडली. अनेक घरांना बाहेरुन कड्या लाऊन घेतल्याने नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही. केवळ ज्येष्ठ पत्रकार दिलीप भिसे यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा ६० हजाराचा ऐवज चोरट्यांच्या हाती लागला.

माधवनगर रेल्वे स्थानकाजवळ शिवोदयनगर आहे. मध्यरात्री चोरट्यांनी प्रथम पत्रकार दिलीप भिसे यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजातून घरात प्रवेश केला. भिसे यांच्या कुटूंबातील काही लोक पहिल्या तर काहीजण दुसºया मजल्यावर झोपले होते. चोरट्यांनी कपाटाच्या चाव्या घेऊन कपाट उघडले. लॉकरमधील सोन्याच्या अर्ध्या तोळ्याच्या दोन अंगठ्या, चांदीचा छल्ला व पाच हजाराची रोकड असा ऐवज लंपास केला.

सांगलीत हॉटेलचालक महिलेस खंडणीसाठी धमकावले

http://www.lokmat.com/sangli/sangli-hoteler-threatens-woman-ransom/

अमरावतीमध्ये दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी पाडला हाणून, आठ गजाआड

http://www.lokmat.com/amravati/police-have-tried-douse-robbery-amravati-eight-inmates/

टेबलवर दोन मोबाईल होते. पण चोरट्यांनी त्याला हात लावला नाही. भिसे यांच्या शेजारी पत्रकार अविनाश कोळी यांच्या घराच्या खिडकीचे ग्रील कापण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. याचठिकाणी अरुण गायकवाड यांच्या घराचे प्रवेशद्वार चोरट्यांनी तोडले. घरातील लोक उठल्याची चाहूल लागल्याने चोरटे पळून गेले. शनिवारी सकाळी सहा वाजता हा प्रकार उघडकीस आला. संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

माधवनगरमध्ये भगत गल्लीतही चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. बापू गायकवाड हे कुटूंबासह दोन दिवसापूर्वी परगावी गेले आहे. याची संधी साधून चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी व कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. कपाटातील साहित्य विस्कटून टाकले. लॉकरही उघडले. गायकवाड कुटूंब नसल्याने घरातून काय चोरीला गेले आहे, हे समजू शकले नाही. हे कुटूंब रविवारी परगावाहून येणार आहे.

याचठिकाणी उल्हास गायकवाड, प्रदीप गायकवाड यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न केला. तेथील जालिंदर पाटील यांच्यासह चार ते पाच घरांना चोरट्यांनी बाहेरुन कड्या लाऊन घेतल्या होत्या. व्यापारी गणपत पाटील यांचे खारीक व खोबºयाचे गोदामही फोडले आहे. पण चोरीला काहीच गेले नाही. घटनास्थळी चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथकास पाचारण केले होते. रात्री मुसळधार पाऊस झाल्याने श्वान परिसरातच बराच वेळ घुटमळले.

टॅग्स :Crimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणे